मुल :शहरात लाखो रुपये खर्च करुण नवीन नळ पाइप लाइंन नव नव्या पाण्याचा टाक्या तयार करण्यात आल्या 24 तास नळ पुरवठा देणार म्हणुन गाजावाजा करण्यात आला 24 तास तर सोडा एक टाईम्स सुद्धा नळाला पाणि येत नाही ही मुल शहराची सर्वात मोठी समस्या व शोकांतिका आहे शहरांतर्गत पाइपलाइनला ठिकठिकाणी लागलेली लागलेली गळती, नवीन झालेल्या पाइपलाइन्स तरी सुद्द्धा भर पावसाळ्यात नळाला पाणी नाही काय कारण असू शकतो? पाणी वितरणाच्या पद्धतीमधील असमतोलपणा यामुळे रोज मुल शहरातील कुठल्या ना कुठल्या भागात नागरिकांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे.

पाण्याचा अपुरा आणि अनियमित पुरवठा ही नित्याची बाब बनली आहे. नागरिक नियमित पाणीपुरवठ्यासाठी रस्त्यावर उतरत आहेत.शहरात बोगस
कार्यालयीन कागदपत्रे आणि नियमित फीची भरणा न करता ऑफिसबाहेर आर्थिक तडजोडी करत काहींनी नळ कनेक्शन घेतली आहेत. संगनमत करून बांधकामासाठी पिण्याचे पाणी वापरले जाते. यामुळे पाणीपुरवठा योजनेचा फज्जा उडत आहे. असा बोगस नळ धारकांना तसेच टिल्लू पंप वापरणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे यांच्यावर नगर परिषद च्या संबधीत कर्मचाऱ्याने अधिकार्यांनी ल़क्ष देऊन कारवाई करावे अशी मागणी मुल शहारात जोर धरत आहे




