शासनाची तसेच जनतेची दिशाभूल करुण भूखंड विक्रीचा गोरख धंदा सुरू
गडचिरोली. सर्वाधिक वनजमिनी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात भूमाफिया सक्रिय झाले आहेत. गरीब शेतकऱ्यांना उपजीविका देण्यासाठी वनहक्कातून मिळालेल्या सरकारच्या जमिनीवर भूमाफियांनी आपली वाईट नजर ठेवली आहे. सदर जमीन कवडीमोल भावाने खरेदी करून भूखंड पाडून कोट्यवधी रुपये कमावण्याचा घोटाळा त्यांनी सुरू केला आहे. त्यामुळे गरीब शेतकरी आणि श्रीमंतांच्या जमिनींवर छापे टाकूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस पावले उचलली जात नाहीत. विशेषत: जिल्हा मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असे प्रकरण सुरू झाले आहे.
वनहक्कानुसार दिलेली जमीन ही केवळ शेती करून उदरनिर्वाहासाठी देण्यात आली आहे. शासनाच्या निर्णयानुसार वनहक्क जमिनीची विक्री करता येणार नाही तसेच सदर जमिनीवर अकृषिक उद्योग किंवा कायमस्वरूपी बांधकाम करण्यास परवानगी नाही. परंतु गडचिरोली शहरातील काही भूमाफियांनी सदर जमीन गडचिरोली येथील मूळ वनपट्टेधारकांकडून खरेदी करून प्लॉट तयार करून विकण्यास सुरुवात केली आहे.
. तसेच पावसाचे पाणी जमा असलेल्या ठिकाणि जिथे पुर परिस्थिती निर्माण होते अशा ठिकाणी जनतेची दिशाभुल करुण भूमाफियांकडून या ठिकाणी भूखंड तयार करून विकण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सदर जागेवरील संबधित विभागाने चोकशी करुन योग्य कारवाई करावी अशी जनतेची मागणी आहे
सत्याला वाचा फोडणारे एकमेव न्यूज पोर्टल तसेच जमीनी संबधीत कुणाची फसवणुक झालि असल्यास खबर महाराष्ट्राची न्युज ला संपर्क साधावा




