spot_img
Monday, April 20, 2026
HomeMaharashtraप्रकरण पाच कुटुंबीयांवर विषप्रयोग, संघमित्रा पतीला संपवताना घाबरत होती,

प्रकरण पाच कुटुंबीयांवर विषप्रयोग, संघमित्रा पतीला संपवताना घाबरत होती,

मामीला आणखी ११ जणांचा उडवायचे होते

गडचिरोली ( जिल्हा प्रतिनिधी ): गडचिरोलीतील अहेरी तालुक्यामधील महागाव येथे २० दिवसांत पाच नातेवाईकांना विष पाजून ठार मारल्याप्रकरणी अटक झालेल्या दोघी आरोपींनी अनेक धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत. आरोपी मामी रोजा रामटेके हिला चार एकरचा भूखंड हडपण्यासाठी कुटुंबातील किमान १६ जणांचा जीव घ्यायचा होता. तर सहआरोपी असलेली तिची भाचेसून संघमित्रा कुंभारे हिला वडिलांच्या आत्महत्येचा बदला घेण्यासाठी फक्त सासरे शंकर आणि सासूबाई विजया कुंभारे या दोघींनाच ठार मारायचे होते. मात्र मामेसासूच्या जबरदस्तीमुळे तिने पतीसह आणखी तिघांचा जीव घेतला.

१८ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आलेल्या संघमित्रा आणि रोजा पोलिस कोठडीत आहेत. चौकशीदरम्यान प्रकृती अस्वास्थ्याची तक्रार केल्यानंतर संघमित्राला वैद्यकीय निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रोजाचा पती प्रमोद देखील पोलिसांच्या रडारवर आहे. कारण कदाचित त्याला पत्नीने आखलेला प्लॅन माहिती असावा किंवा विषबाधा करण्यात त्याने मदत केली असावी, असा पोलिसांना संशय आहे. पोलिसांना प्रमोदची चौकशी करायची होती पण त्याने विषबाधेमुळे आपलीही केस गळती झाल्याचा दावा केला, त्यामुळे तपास पथकाने त्याच्यावर कोणतीही जबरदस्ती केली नाही.

चार एकर जमिनीपायी पाच जीव गेले
गडचिरोली पोलिसांनी सांगितले की, रोजाचा पती प्रमोदच्या चार बहिणी, त्यांचे पती आणि मुलांनी चार एकर जमिनीत समसमान वाटा मागितल्याने त्यांच्यात वैर निर्माण झाले होते. त्यामुळे तिने संघमित्रा या कृषी शास्त्रज्ञ असलेल्या भाचेसुनेशी हातमिळवणी केली. संघमित्राने थॅलियम वापरुन स्लो पॉयझनिंगद्वारे एकेकाला संपवण्याची योजना आखली.
संघमित्राचा पती रोशन, सासरे शंकर, सासू विजया, सासूची बहीण (मावस सासू) वर्षा उराडे आणि रोशनची बहीण (नणंद) कोमल दहेगावकर यांचा विषबाधेमुळे मृत्यू झाला. आणखी तिघे विषबाधेच्या लक्षणांमुळे रुग्णालयात उपचार घेत आहेत.

दीड महिने संशोधन

संघमित्राच्या मोबाईल सर्च हिस्ट्रीनुसार, ऑगस्टमध्ये तिने विषावर संशोधन सुरू केले होते. गंधहीन, रंगहीन आणि अत्यंत विषारी असलेले थॅलियम अशाप्रकारे निवडण्यात आले.

रोजाचा पती आणि चार बहिणी, विजया कुंभारे, वर्षा उराडे आणि इतर दोघींना त्यांच्या वडिलांकडून चार एकर जमीन वारसाहक्काने मिळाली होती. चार बहिणींनी आपला हक्क सोडावा अशी रोजाची इच्छा होती, त्यामुळे विजया आणि वर्षा नाराज झाल्या होत्या.नवऱ्याला संपवताना संघमित्राची का-कू

पोलिसांनी सांगितले, की संघमित्राच्या चौकशीत असे आढळून आले, की ती पती रोशनशी भावनिकरित्या जोडलेली होती. ऑगस्टमध्ये त्याने तिला मारहाण केली त्यामुळे तिने आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र रोशनला विष पाजण्यावरून संघमित्राच्या मनात संभ्रम होता. परंतु एप्रिलमध्ये संघमित्राच्या वडिलांनी केलेल्या आत्महत्येची आठवण करुन घेत रोजाने तिला बळजबरी केली.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे