मुल : शहराचा मुख्य मार्गावर अनेक व्यावसायिकांनी अतिक्रमण केलेले आहे. अतिक्रमण केल्याने पार्किंग चा जागी सर्रासपणे दुकानातील साहित्य ठेवल्याने रस्ता अरुंद होत आहे. अशा समस्या मुळे मुल शहारात अपघाताचे प्रमाण वाढले आहे, हि बाब गंभिर असून स्थानिक प्रशासनाने अशा व्यावसायिकांचा विरोधात कायर्वाही करुण संबधीत अतिक्रमण हटवावे तसेच मोठ मोठे वाहणे रस्त्यावर ठेवून अळथळा निर्माण करणाऱ्यांवर सुद्द्धा कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे. अशा बाबी कडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात मोठे अपघात होण्याचि शक्यता नाकारत येत नाही.





